निवडणूक लढवत आहोत कि कुस्ती याचे भान देखील साहित्यिकांना राहिली नाही - राज ठाकरे

निवडणूक  लढवत आहोत कि कुस्ती याचे भान देखील साहित्यिकांना राहिली नाही - राज ठाकरे

गुरुवार ,पुणे


     मराठी समृद्ध आहेच परंतु ती व्यवस्थितपणे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचवली जाणे गरजेचे आहे . परदेशात खाद्य संस्कृती देखील कटाक्षाने पाळली जाते परंतु आपल्याकडे खाद्य संस्कृती तर सोडाच पण आपल्या मातृभाषेच्या जतनाकडे देखील दुर्लक्ष केले  जाते अशी खंत माननीय राज ठाकरे यांनी व्यक्त केली . ते गुरुवारी टिळक स्मारक येथे ऐसी अक्षरे मासिकाच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
 गेल्या काही वर्षात साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक हि कलह व वादा विना पार पडतच नाही . निवडणूक  लढवत आहोत कि कुस्ती याचे भान देखील साहित्यिकांना राहिली नाही . त्यामुळे वर्षात सर्वात जास्त पुस्तके ज्या साहित्यिकाची विकली जातील त्यास अध्यक्ष पद बहाल करावे असे देखील राज यांनी मिश्कील  पणे  सुचवले .

"ऐसी अक्षरे मासिकाची दशकपूर्ती "
टिळक स्मारकात पार पडलेल्या ' ऐसी अक्षरे  मासिकाच्या  दशकपूर्ती  कार्यक्रमासाठी मा . राज ठाकरे ,मासिकाचे सर्वे सर्वा बेलवलकर बंधू ,एबीपी  माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, जेष्ठ लेखिका मोनिका गजेंद्रगडकर व मासिकाचे मुख्य संपादक पद्मनाभ हिंगे उपस्थित होते. 
     राजीव खांडेकर यांनी मराठी भाषेचे भवितव्य काय? या गंभीर प्रश्नावर त्यांचे विचार मांडले. मराठी भाषेच्या तोकड्या वापराचा दोष हा माध्यमे व साहित्य लेखनातील चुकांमुळे निर्मान झाला असल्याचे त्यांनी दाखल्यासहित स्पष्ट करून दाखविले. माध्यमे त्यांना सोयीची व हवी तेवढीच मराठी शब्द वापरत असतात त्यामुळे समृद्ध असे पर्यायी शब्द लोप पावत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर करणे हे उच्चभ्रू लोकांचे लक्षण आहे अस न्यूनगंड मराठी माणसाच्या हाडामासात बिंबला आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी ऐसी अक्षरे मासिकाच्या अथिती संपादिका मोनिका गजेंद्रगडकर ह्यादेखील उपस्थित होत्या. "संवेदनक्षम जगण आपण विसरत आहोत" असे त्या म्हणाल्या. 
    कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन मासिकाचे मुख्य संपादक पद्मनाभ हिंगे यांनी केले. 

Post a Comment