अरे हे चाललंय तरी काय ?

अरे हे चाललंय तरी काय ?

तमाम देशवासीय आज रामनामाचा जप करत असताना देशात क्षणाक्षणाला स्त्रियांचा अपमान होत आहे. वर्तमानपत्र उघडा किंवा दूरचित्रवाणी संच लावा.  सगळीकडे ह्या संदर्भातील बातम्याच दिसतात. खून, बलात्कार, हुंडाबळी, विनय भंग . . . यादी वाढतच चालली आहे .
हे सर्व वाचून बघून चीड येते व हताशपणासुद्धा जाणवतो. आज आपण इतके क्रूर, हिंस्र झालो का आहोत? हे चालालंय तरी काय? कधी थांबणार हे? लोकांना माणुसकीची शिकवण द्यायला देवालाच पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागणार बहुतेक . 

गेला मनोहर कुणीकडे

गेला मनोहर कुणीकडे 

         दसरा महोत्सवाला शिवसेनेच्या व्यासपीठावर जे घडले याची साक्षीदार संपूर्ण मुंबई आहे . मनोहर जोशी यांनी केलेल्या पक्ष नेतृत्वावरील टीकेचे पडसाद दसरा महोत्सवात उमटले आणि  आपल्याच पक्षाच्या कार्यक्रमातुन,व्यासपीठावरून चालते व्हावे लागले. पक्षातील जेष्ठ नेते भर कार्यक्रमातुन चालते झाले तरी त्यांना कुणी नेत्यांनी थाबवण्याचा प्रयत्न पण केला नाही. हा पाणउतारा पाहून एकच गोष्ट ध्यानात येते कि माणसाला केव्हा  आणि कुठे  थांबायचे हे जर लक्षात आल नाही तर त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात .