पुण्यात होणार रौप्यमहोत्सवी बालकुमार साहित्य संमेलन

पुण्यात होणार रौप्यमहोत्सवी बालकुमार साहित्य संमेलन 
प्रशांत दामले यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण 

पुणे - "प्रत्येक मूल हे स्वतंत्र संमेलन असते, लहान मुलांमुळे घरातले वातावरण देखील उत्साही राहते. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा बाल कुमार साहित्य संमेलनाची गरज आहे", असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. 
  संवाद संस्थेच्या वतीने पुण्यात होणाऱ्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुधवारी दामले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. संवादचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, नवीन इंदलकर, ल. म. कडू आदी यावेळी उपस्थित होते. गेली २४ वर्षे हे संमेलन दरवर्षी भरवण्यात येते. आतापर्यंत सोलापूर, जळगाव, इचलकरंजी, सातारा, परभणी, संगमनेर अशा महाराष्ट्रातील विविध भागांत ते झाले आहे. दि. २९, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. 

Post a Comment